"गोंद्या आला रे"
२२ जून १८९७
चाफ़ेकर बंधूंकडून पुण्याच्या गणेशखिंडीत रॅंडचा वध. २२ जून हा चाफेकर बंधूंनी केलेल्या रॅंड वधाच्या घटनेचा स्मृतिदिन.
देशात उफाळलेल्या असंतोषाचे प्रतीक म्हणून या थरारक प्रसंगाची गणना केली जाते. स्वातंत्र्य संग्रामात इंधन ओतण्याचं काम करणाऱ्या या घटनेचं ऐतिहासिक मोल मोठं आहे.
१८९६ च्या अखेरीस पुण्यात प्लेगचा कहर उसळला. त्या कामी सरकारने केलेली उपाययोजना व्याधीच्या दृष्टीने योग्य होती. पण, लोकांच्या भावना लाथाडून केल्यामुळे लोक संतप्त बनले. रूग्णालयात जाणं म्हणजे मरण असे त्यांना वाटू लागले आणि ते रोग लपवू लागले. त्यामुळे इंग्रजांचे शोधपथक पुण्यातील घराघरांतून धुमाकूळ घालू लागले. देवघरातील देवावर थुंकण्यापर्यंत त्यांची मजल गेली. लोकांच्या देवधर्माच्या भावनांना लाथाडणे, मुलीबाळींना घराबाहेर ओढणे आणि पुरुषवर्गाला अनेकप्रकारे अपमानित करणे याचा उच्छाद मांडला गेला होता. यामुळे दामोदरपंतांची रॅंड वधाची इच्छा तीव्र झाली.
पुण्याचे लोक अत्याचाराने त्रस्त असतानाच सरकारने व्हिक्टोरिया राणीचा हीरकमहोत्सव मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरवले. या दिवशीच रॅंडचा वध करायचा निश्चय दामोदरपतांनी केला. २२ जून १८९७ रोजी राणीच्या हीरकमहोत्सवा- निमित्त गणेशखिंडीत मेजवानी देण्यात आली. त्यावेळी अनेक युरोपियन हजर होते. या दिवशी दामोदरपंत, रानडे, बाळकृष्ण आणि विनायक आपटे आपापली रिव्हॉल्वर घेऊन सायंकाळी साडेसातच्या सुमारास बाहेर पडले आणि गणेश खिंडीतील गव्हर्नमेंट हाऊसपासून थोड्या अंतरावर काळोखात दबा धरून बसले.
मेजवानीनंतर रॅंड गाडीतून परत जाऊ लागला की "गोंद्या आला रे आला' असा खुणेचा शब्द उच्चारायचे ठरले. त्यासाठी वासुदेव चाफेकरांना मागावर पाठवण्यात आले.
मेजवानी झोडून पाहुणे गव्हर्नमेंट हाऊसमधून परतू लागले. गाड्या उतारावर येताच "गोंद्या आला रे आला' हा परवलीचा शब्द उच्चारला गेला आणि रॅंडसारखी दिसणारी आयर्स्टची गाडी दिसताच बाळकृष्णपंतांनी आयर्स्टच्या मस्तकावर पिर्स्तेल झाडलं. गाडीत बसलेल्या मिसेस आयर्स्टला हे कळताच तिने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली.
बाळकृष्णपंतांनी गोळी लागल्याने कोसळलेल्या व्यक्तीला पडताना पहिले परंतु वासुदेवरावांचा परवलीचा घोष अद्याप सुरूच होता. चुकून भलताच माणूस मारला गेला ही गोष्ट दामोदरपंतांच्या लक्षात आली. तोच रॅंडची गाडी आणि तिच्या पाठोपाठ धावणारा वासुदेव चाफेकर त्यांना दिसला.
दामोदरपंतांनी तात्काळ गाडीवर उडी घेऊन रॅंडच्या पाठीला पिस्तूल लावून चाप ओढला. गोळ्या फुफ्फुसातून आरपार जाऊन रॅंड बेशुध्द पडला. गोळ्या लागताच आयर्स्ट मरण पावला. रॅंड मात्र औषधोपचारांनी बेशुध्दीतून २२ जूनला थोडा शुध्दीवर आला पण त्याला कोणतेही वक्तव्य करता आले नाही. रॅडने ३ जुलै १८९७ रोजी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर प्राण सोडले. रँडची हत्या हि पहिली राजकीय हत्या ठरली.
पुणे युनिवर्सिटीजवळ असलेल्या गणेशखिंडीनजीक ही घटना घडली. चापेकर बंधु त्यावेळी निसटण्यात यशस्वी झाले असले तरी नंतर तिघांनाही नंतर पकडण्यात आले. रँड प्रकरणी हत्या करणाऱ्यांची नावे इंग्रज सरकारला कळवनारयास २०००० रू. चे बक्षीस देण्यात येईल असे इंग्रज सरकारने जाहीर केले होते.
चापेकर बंधूंना द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे अटक झाली. रँडची हत्या केल्या प्रकरणी चाफेकर बंधूंची नावे गणेश व रामचंद्र द्रविड यांनी इंग्रज सरकारला कळवली. याचा बदला चापेकरांचे तिसरे बंधू वासुदेव हरी चापेकर व त्यांचे एक सहकारी महादेव रानडे यांनी खुन्या मुरलीधराजवळ द्रविड बंधूंचा वध करून घेतला. त्यानंतर त्यांनाही अटक झाली.
दामोदर चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले. त्यानंतर वासुदेव चापेकर यांना ८ मे १८९९ तसेच बाळकृष्ण चापेकर यांना १२ मे १८९९ रोजी येरवडा तुरुगात फाशी देण्यात आली.
रँडच्या वधाच्या वेळी दामोदरपंतांचे हे अवघे वय होते २७ वर्षे, बाळकृष्ण यांचे वय होते २४ वर्षे व वासुदेवरावांचे वय होते १८ वर्षे. अवघ्या विशी-पंचवीशीतील या तरुणांचा त्याग व शौर्य पाहून आजही उर अभिमानाने भरून येतो ! राष्ट्रकार्यासाठी तीन सख्या भावांनी केलेले हे बलिदान जगात एकमेव आहे ! त्यांच्या या त्यागास व शौर्यास विनम्र अभिवादन. 🙏
===========================
साभार - Nitin Pise
२२ जून १८९७
चाफ़ेकर बंधूंकडून पुण्याच्या गणेशखिंडीत रॅंडचा वध. २२ जून हा चाफेकर बंधूंनी केलेल्या रॅंड वधाच्या घटनेचा स्मृतिदिन.
देशात उफाळलेल्या असंतोषाचे प्रतीक म्हणून या थरारक प्रसंगाची गणना केली जाते. स्वातंत्र्य संग्रामात इंधन ओतण्याचं काम करणाऱ्या या घटनेचं ऐतिहासिक मोल मोठं आहे.
१८९६ च्या अखेरीस पुण्यात प्लेगचा कहर उसळला. त्या कामी सरकारने केलेली उपाययोजना व्याधीच्या दृष्टीने योग्य होती. पण, लोकांच्या भावना लाथाडून केल्यामुळे लोक संतप्त बनले. रूग्णालयात जाणं म्हणजे मरण असे त्यांना वाटू लागले आणि ते रोग लपवू लागले. त्यामुळे इंग्रजांचे शोधपथक पुण्यातील घराघरांतून धुमाकूळ घालू लागले. देवघरातील देवावर थुंकण्यापर्यंत त्यांची मजल गेली. लोकांच्या देवधर्माच्या भावनांना लाथाडणे, मुलीबाळींना घराबाहेर ओढणे आणि पुरुषवर्गाला अनेकप्रकारे अपमानित करणे याचा उच्छाद मांडला गेला होता. यामुळे दामोदरपंतांची रॅंड वधाची इच्छा तीव्र झाली.
पुण्याचे लोक अत्याचाराने त्रस्त असतानाच सरकारने व्हिक्टोरिया राणीचा हीरकमहोत्सव मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरवले. या दिवशीच रॅंडचा वध करायचा निश्चय दामोदरपतांनी केला. २२ जून १८९७ रोजी राणीच्या हीरकमहोत्सवा- निमित्त गणेशखिंडीत मेजवानी देण्यात आली. त्यावेळी अनेक युरोपियन हजर होते. या दिवशी दामोदरपंत, रानडे, बाळकृष्ण आणि विनायक आपटे आपापली रिव्हॉल्वर घेऊन सायंकाळी साडेसातच्या सुमारास बाहेर पडले आणि गणेश खिंडीतील गव्हर्नमेंट हाऊसपासून थोड्या अंतरावर काळोखात दबा धरून बसले.
मेजवानीनंतर रॅंड गाडीतून परत जाऊ लागला की "गोंद्या आला रे आला' असा खुणेचा शब्द उच्चारायचे ठरले. त्यासाठी वासुदेव चाफेकरांना मागावर पाठवण्यात आले.
मेजवानी झोडून पाहुणे गव्हर्नमेंट हाऊसमधून परतू लागले. गाड्या उतारावर येताच "गोंद्या आला रे आला' हा परवलीचा शब्द उच्चारला गेला आणि रॅंडसारखी दिसणारी आयर्स्टची गाडी दिसताच बाळकृष्णपंतांनी आयर्स्टच्या मस्तकावर पिर्स्तेल झाडलं. गाडीत बसलेल्या मिसेस आयर्स्टला हे कळताच तिने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली.
बाळकृष्णपंतांनी गोळी लागल्याने कोसळलेल्या व्यक्तीला पडताना पहिले परंतु वासुदेवरावांचा परवलीचा घोष अद्याप सुरूच होता. चुकून भलताच माणूस मारला गेला ही गोष्ट दामोदरपंतांच्या लक्षात आली. तोच रॅंडची गाडी आणि तिच्या पाठोपाठ धावणारा वासुदेव चाफेकर त्यांना दिसला.
दामोदरपंतांनी तात्काळ गाडीवर उडी घेऊन रॅंडच्या पाठीला पिस्तूल लावून चाप ओढला. गोळ्या फुफ्फुसातून आरपार जाऊन रॅंड बेशुध्द पडला. गोळ्या लागताच आयर्स्ट मरण पावला. रॅंड मात्र औषधोपचारांनी बेशुध्दीतून २२ जूनला थोडा शुध्दीवर आला पण त्याला कोणतेही वक्तव्य करता आले नाही. रॅडने ३ जुलै १८९७ रोजी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर प्राण सोडले. रँडची हत्या हि पहिली राजकीय हत्या ठरली.
पुणे युनिवर्सिटीजवळ असलेल्या गणेशखिंडीनजीक ही घटना घडली. चापेकर बंधु त्यावेळी निसटण्यात यशस्वी झाले असले तरी नंतर तिघांनाही नंतर पकडण्यात आले. रँड प्रकरणी हत्या करणाऱ्यांची नावे इंग्रज सरकारला कळवनारयास २०००० रू. चे बक्षीस देण्यात येईल असे इंग्रज सरकारने जाहीर केले होते.
चापेकर बंधूंना द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे अटक झाली. रँडची हत्या केल्या प्रकरणी चाफेकर बंधूंची नावे गणेश व रामचंद्र द्रविड यांनी इंग्रज सरकारला कळवली. याचा बदला चापेकरांचे तिसरे बंधू वासुदेव हरी चापेकर व त्यांचे एक सहकारी महादेव रानडे यांनी खुन्या मुरलीधराजवळ द्रविड बंधूंचा वध करून घेतला. त्यानंतर त्यांनाही अटक झाली.
दामोदर चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले. त्यानंतर वासुदेव चापेकर यांना ८ मे १८९९ तसेच बाळकृष्ण चापेकर यांना १२ मे १८९९ रोजी येरवडा तुरुगात फाशी देण्यात आली.
रँडच्या वधाच्या वेळी दामोदरपंतांचे हे अवघे वय होते २७ वर्षे, बाळकृष्ण यांचे वय होते २४ वर्षे व वासुदेवरावांचे वय होते १८ वर्षे. अवघ्या विशी-पंचवीशीतील या तरुणांचा त्याग व शौर्य पाहून आजही उर अभिमानाने भरून येतो ! राष्ट्रकार्यासाठी तीन सख्या भावांनी केलेले हे बलिदान जगात एकमेव आहे ! त्यांच्या या त्यागास व शौर्यास विनम्र अभिवादन. 🙏
===========================
साभार - Nitin Pise
No comments:
Post a Comment