Thursday, June 30, 2016

मी शोधलीय "शांती" आणि घराचं नावच "समाधान" ठेवलंय

सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत "राग" भेटला. मला पाहून म्हणाला .....
काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?

मी म्हणालो अरे नुकताच "संयम" पाळलाय घरात आणि "माया" पण माहेरपणाला आली आहे.

तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला.

पुढे बाजारात "चिडचिड" उभी दिसली गर्दीत. खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात "अक्कल" नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला.

आज मला पाहून म्हणाली अरे "कटकट" आणि "वैताग" ची काय खबरबात ?

मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा !  हल्ली मी "भक्ती" बरोबर सख्य केलय त्यामुळे "आनंदा"त आहे अगदी

पुढे जवळच्याच बागेत "कंटाळा" झोपा काढताना दिसला. माझं अन त्याच हाडवैर.... अगदी 36 चा आकडा म्हणाना....

त्यामुळे मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला.

मीही मग मुद्दाम "गडबडी"कडे लिफ्ट मागितली आणि तिथून सटकलो.

पुढे एका वळणावर "दुःख" भेटलं
मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"

मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि वाट लावायच्या तयारीत होतास? आणि माझ्या बायकोपेक्षा तूच जास्त वाट बघतोस कि रे माझी" तसं "लाजून" ते म्हणालं, "अरे मी पाचवीलाच पडलो (पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात.  कस काय सर्व ? घरचे मजेत ना?".

मी म्हणालो, छान चाललय सगळं....... "श्रद्धा" आणि "विश्वास" असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात त्यांच्या मदतीने मस्त चाललंय.
तू नको "काळजी" करूस. हे ऐकल्यावर ओशाळलं आणि निघून गेलं.

थोडं पुढे गेलो तोच "सुख" लांब उभं दिसलं तिथूनच मला खुणावत होतं,  धावत ये नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय.....

मी म्हणालो, "अरे कळायला लागल्यापासून तुझ्याच तर मागे धावतोय उर फुटे पर्यंत, आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झालीय.....

एकदा दोनदा भेटलास पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट करून मला एकटं पाडलत दर वेळी. आता तूच काय तुझी "अपेक्षा" पण नकोय मला.

मी शोधलीय माझी "शांती" आणि घराचं  नावच "समाधान" ठेवलंय."

😇🌹😇🌹😇🌹😇🌹😇🌹😇

Written by : unknown creative 

Monday, June 27, 2016

त्यालाच 'आयुष्य ' म्हणतात.. -- व. पु. काळे

जग कसं अजब आहे..

देवावर प्रेम सर्वांनाच आहे.
पण ' त्याच्या घरी ' जायची घाई मात्र कुणालाच नाही.

आपल्या घरात सर्वांनाच देव हवा.
पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते.

देव आपल्या घरी आला,म्हणजे सण,उत्सव आणि आनंद.
आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख,शोक..

देव आपल्या घरी यावा,म्हणून आटापिटा.
आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा..

देवाघरून येणं,म्हणजे जन्म..देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू. दोन्ही अटळ आहे.

पण ह्या मधली जी गम्मत आहे,
त्यालाच 'आयुष्य ' म्हणतात.

- -  व. पु. काळे

🎼🎵🎼🎵🎼🎵🎼🎵🎼🎵🎼

Sunday, June 26, 2016

'उपयोग काय त्याचा?' - विं. दा करंदीकर

विं. दा करंदीकर यांची एक छान कविता -

शीर्षक - 'उपयोग काय त्याचा ?'

शब्दांत भाव नाही,
ना वेध अनुभवाचा ;
रचना सुरेख झाली !
उपयोग काय त्याचा ?

व्याहीच पत्रिकेचा
घालीत घोळ बसले;
नवरी पळून गेली !
उपयोग काय त्याचा ?

सुगरण रांधणारी,
सुग्रास अन्न झाले ;
अरसिक जेवणारे,
उपयोग काय त्याचा ?

जमली महान सेना,
शस्त्रे सुसज्ज झाली ;
नेता कचखाऊ निघाला,
उपयोग काय त्याचा ?

ऐश्वर्य प्राप्त झाले,
झाली दिगंत कीर्ती ;
स्नेही न एक लाभे !
उपयोग काय त्याचा ?

सर्वांस स्वास्थ्य आले,
सगळीकडे सुबत्ता ;
स्वातंत्र्य फक्त नुरले !
उपयोग काय त्याचा ?

केले गुरु अनेक,
यात्रा कित्त्येक केल्या ;
शांती न प्राप्त होता,
उपयोग काय त्याचा ?

🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁

बायको बरोबर साड्यांच्या दुकानात.. - पु. ल.

"ही लिंबू-पारवा कॉम्बिनेशनची साडी कशी वाटतिये?" बायकोनी विचारलं...

"लिंबू... आणि पारवा...? हे रंग आहेत...?" माझा प्रश्न...

"बरं, ही जाऊ दे... ती श्रीखंडी कशी आहे?"... बायकोचा प्रतिप्रश्न...

"श्रीखंडी?... नको... चिकट असेल..." मी उगाच विनोद मारायचा प्रयत्न केला... पण त्यावर बायको आणि तिला उत्साहानं साड्या दाखवणारा सेल्समन दोघांच्या चेहऱ्यावरची सुरकुतीही हालली नाही...

"बरं, ते ही जाऊ दे.... चिंतामणी किंवा गुलबक्षी रंगात काही बघू का यंदा" बायकोनी विचारलं...

आता मला माझ्या अज्ञानाची प्रकर्षानं जाणीव व्हायला लागली...

जगात "ता ना पि हि नि पा जा" हे एवढेच सातच रंग असतात ही माझी पक्की समजूत होती आणि आहे... त्यातल्याही, तांबड्या आणि नारंगीत किंवा निळ्या आणि जांभळ्यात मला पटकन फरक समजत नाही... या शिवाय पारवा हे रंगाचं नसून कबुतरासारख्या दिसणाऱ्या पक्ष्याचं नाव आहे अशी माझी अनेक वर्षं समजूत आहे...

हे सात रंग आणि सरधोपट पांढरा किंवा काळा हे रंग सोडले रंगांच्या इतर छटा एकतर मला ओळखता येत नाहीत किंवा काहीतरी वेगळं आहेच असं वाटलं तर त्यांची नावं मला समजत नाहीत...

माझा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे, मला हिरवा रंग हिरवाच दिसतो, त्यातल्या कशाला पोपटी म्हणायचं, कशाला सी ग्रीन म्हणायचं आणि कशाला बॉटल ग्रीन हे कळत नाही... तेच निळ्या रंगाचं... निळा म्हणजे निळा... त्यात स्काय ब्लू कोणता आणि मोरपंखी कोणता याचंही मला आकलन होत नाही...

या शिवाय, "डाळिंबी" हा रंग नसून ते "मोसंबी" सारखं देशी दारूचं नाव असावं, "तपकिरी" हे तपकीरचं अन "शेवाळी" हे शेवाळ्याचं अनेक वचन असावं आणि मोतिया हे एखाद्या नबाबाघरच्या पांढऱ्या कुतियेचं नाव असावं अशीही माझी अनेक वर्षं समजूत होती...

पण बायको बरोबर साड्यांच्या दुकानात गेलं की या साऱ्या साऱ्या समजुतींना सुरुंग लागतो. अन या सुरुंगाच्या स्फोटातून लाल, तांबड्या, नारंगी, चिंतामणी, पिवळ्या आणि लिंबू रंगांच्या ज्वाला उसळायला लागून त्यातून राखाडी, पारवा, तपकिरी, किरमिजी रंगांच्या धुराचे लोट उसळायला लागतात...

असो. तर मी असा माझ्या अज्ञानाच्या गर्तेत गटांगळ्या घेत असतानाच बायकोचा पुढचा प्रश्न आला....

"ही केतकी रंगाची साडी कशी आहे? बघ ना... आमसुली काठ आहेत..."

"आमसुली?" माझा शेवटचा प्रश्न असतो...

त्याकडे दुर्लक्ष करून बायको ती साडी अंगावर लपेटून आरशात स्वतःला न्याहाळायला लागते.

अन आपल्याला आवडलेली साडी अंगावर लपेटून आरशात स्वतःकडेच बघत असताना, तिच्या चेहऱ्यावर जो रंग उजळलेला दिसतो त्या रंगाचं नाव काय असावं याचा मी विचार करत बसतो.

- पु. ल. देशपांडे

🎉🎀🎉🎀🎉🎀🎉🎀🎉🎀🎉

Saturday, June 25, 2016

काही शब्द जीवाभावाचे वाटतात, कारण ...

आयुष्यात माणसांचे येणं-जाणं चालूच असतं.
भूतकाळ आठवला की कळतं, कित्येक हात आपणही सोडलेत.

एकेकाळी त्यांच्या शिवाय जगणं जमेल की नाही हा प्रश्न पडलेले आपण अजूनही जिवंत आहोत.
का? कारण शरीर निर्लज्ज असतं.

वेळ जाते, माणसं बदलतात, माणसांसोबत आपणही बदलतो. कुणी आलं म्हणून त्रास होतो, तर कुणी गेलं म्हणून त्रास होतो, कधी आलेलं गेलं म्हणून त्रास होतो तर कधी गेलेलं आलं म्हणून त्रास होतो. पण कुणी गेलं तरी आयुष्याच्या काही क्षणी त्या व्यक्तीची आठवण प्रकर्षाने येते. आठवण काढता येत नाही. ती येते विना परवानगी.

एकेकाळी 'आपण' असलेला शब्द 'तू' आणि 'मी' झाल्यावरही तितकाच जवळचा वाटू शकतो!
काही दिसलं काही ऐकलं की, आठवतं काही न काही....कोणी ना कोणी.

शब्द एकटे नसतात. शब्दांना माणसं चिकटलेली असतात, म्हणूनच काही शब्द जीवाभावाचे वाटतात.

☺❤☺❤☺❤☺❤☺❤☺❤☺

Written by : unknown creative 

Three simple rules in Life

Three simple rules in Life:

1. If you do not go after what you want, you will never have it.

2. If you don’t ask, the answer will always be no.

3. If you do not step forward, you’ll always be in the same place.

Dare to Believe ;
Dare to Dream ;
Dare to Achieve !!

🌷👍🌷👍🌷👍🌷👍🌷👍🌷

Written by : unknown creative 

पु.लं.चा अतिसुंदर लेख - क्षणांचे सोने...

पु.लं.चा अतिसुंदर लेख

क्षणांचे सोने...

जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते तो या जगातला सर्वांत सुखी माणूस. झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो.

असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो.

असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीत होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किंमतीमुळं अस्वस्थ होत नाही.

भावनांच्या घातक चढ-उतारावर टीआरपीचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरील उथळ कार्यक्रमांनी तो भावविवश होत नाही.

त्याच्या घरात ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात, पोट साफ करण्याची चूर्णं नसतात. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र असल्या कर्मकांडात त्याला रस नसतो. तो इमाने इतबारे आपला नोकरीधंदा करतो. बायको-मुलांना नीट सांभाळतो. घरात लक्ष देतो. पाहुण्या-रावळ्यांची देखभाल करतो. बायकोला हवं नको पाहतो. मुलांच्या शाळा-कॉलेजात जाऊन येतो. त्यांची ऍडमिशन-परीक्षा-निकाल साऱ्याचं वेळापत्रक त्याला तोंडपाठ असतं.

त्याला एक मुलगी असली तरी तो खुष असतो. दोन मुली असल्या तरी खुष असतो. एक मुलगा, एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदाने जगत असतो.

त्याला राज्यातील, देशातील, जगातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची माहिती असते. पाणीकपात कधी आहे, मेगाब्लॉक कधी आहे, मोठी भरती कधी आहे, भाज्यांचे-डाळीचे भाव काय आहेत हे माहीत असते. या गोष्टींचा तो बभ्रा करीत नाही की त्यांना तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊ देत नाही. त्यांना तो समंजसपणे सामोरा जातो...

तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो. लोकांच्या सुखदु:खाशी तो अकृत्रिमपणे समरस होतो.

त्यानं अतिशय नियोजनपूर्वक पै-पैसा साठवून स्वत:चं छोटंसं घर मिळवलेलं असतं. किंवा तेवढ्याच आनंदानं तो पागडीच्या किंवा भाड्याच्या घरात राहात असतो. तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपली तुलना करत नाही, दुसऱ्याच्या यशानं कुढत बसत नाही. नशापाणी करण्याची त्याला गरज वाटत नाही; कारण या लहान-मोठ्या गोष्टीत आनंद घेत तो दिवसभर इतका बिझी असतो की जमिनीला पाठ टेकताच त्याला आपोआप झोप येते.


परिसाच्या शोधात प्रत्येक दगडावर आपल्या हातातलं लोखंड ठोकत फिरणाऱ्यांपैकी तो नसतो; कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने कसे करायचे हे त्याला ठाऊक असते..!

~ पु. ल. देशपांडे

💐💐💐💐💐💐💐

Friday, June 24, 2016

जिन्दगी के सफ़र में गुजर जाते हैं जो मकाम ...

जिन्दगी के सफ़र में गुजर जाते हैं जो मकाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते

फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर
पतझड में जो फूल मुरझा जाते हैं
वो बहारों के आने से खिलते नहीं
कुछ लोग एक रोज जो बिछड़ जाते हैं
वो हजारों के आने से मिलते नहीं
उम्रभर चाहे कोई पुकारा करे उनका नाम
वो फिर नहीं आते ...

आँख धोखा है, क्या भरोसा है, सुनो
दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है
अपने दिल में इसे घर बनाने ना दो
कल तड़पना पड़े याद में जिनकी
रोक लो, रुठकर उनको जाने ना दो
बाद में प्यार के, चाहे भेजो हजारो सलाम
वो फिर नहीं आते ...

सुबह आती है, रात जाती है, यूँही
वक्त चलता ही रहता है, रुकता नहीं
एक पल में ये आगे निकल जाता है
आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे पे मंजर बदल जाता है
एक बार चले जाते हैं, जो दिन रात सुबह शाम
वो फिर नहीं आते ...

गीतकार : आनंद बक्षी, गायक : किशोर कुमार, संगीतकार : राहुलदेव बर्मन, चित्रपट : आप की कसम (१९७४)

🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷

Thursday, June 23, 2016

साधं सोप्पं जगावं...

साधं सोप्पं जगावं
दिलखुलास हसावं

न लाजता रडावं
राग आला तर चिडावं
पण झालं-गेलं वेळीच सोडावं

आपल्या माणसांवर हक्कानी रुसावं
रूसलेल्यांना लाडानी पुसावं

वळण येईल तेंव्हा सावकाश वळाव
मोकळ्या रस्त्यावर सुसाट पळावं

खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं
स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं
 
सुंदर जग बनवल्याबद्दल मात्र
त्या परमेश्वराचं कौतुक जरूर कराव.

🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹


Written by : unknown creative 

श्रीकृष्णाची चरित्र कथा सांगते की ..

श्रीकृष्णाची चरित्र कथा सांगते कि तो जन्माला येण्याआधीच त्याला ठार करायची तयारी झाली होती.

 त्यातून तो वाचला. पुढे सतत जीवावर संकटं आली.
 तो लढत राहिला. काही ना काही युक्ती करून वाचला.

 प्रसंगी पळसुद्धा काढला.
पण संकटं टाळावीत म्हणून स्वतःची कुंडली घेवून त्याने ज्योतिषी गाठला नाही,

ना उपास केले.
ना अनवाणी पायाने फिरला..

त्याने पुरस्कार केला फक्त " कर्मयोगाचा!! "

भर रणांगणात अर्जुनाने धनुष्य खाली टाकला.
तेव्हा कृष्णाने, ना अर्जुनाची कुंडली मांडली,
ना गंडे-दोरे बांधले.

 तुझं युद्ध तुलाच करावं लागेल असं त्याने
 अर्जुनाला ठणकावून सांगितलं.

 अर्जुनाने धनुष्य खाली टाकलं ....
तेव्हा श्रीकृष्णाने ते उचलून स्वतः
अर्जुनातर्फे लढाई केली नाही. .....

श्रीकृष्ण हा सर्वात शक्तिशाली योद्धा होता.
त्याने मनात आणलं असतं तर एकट्याने कौरवांचा पराभव केला असता. . .

 पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरलं नाही.
 जर अर्जुन लढला तरच त्याने अर्जुनाचा सारथ्य करण्याची तयारी दाखवली. .
एक महान योद्धा सारथि बनला.
अर्जुनाला स्वतःची लढाई ,
स्वतःलाच करायला लावली.. . .
 ह्या कृतीतून संदेश दिला कि ,
जर तुम्ही स्वतःचा संघर्ष करायला,
 स्वतः सज्ज झालात तरच
 मी तुमच्या पाठीशी आहे .. .
मी तुमचा सारथि  बनायला तयार आहे..

 पण तुम्ही लढायला तयार नसाल,
 तर मी तुमच्या वतीने संघर्ष करणार नाही . . .

तुमच्या पदरात फुकट यश टाकणार नाही.

कोणत्याही देवाचा-देवीचा . .
आशीर्वाद घ्यायला जाल तेव्हा ..
श्रीकृष्णाला विसरू नका.

अनवाणी चालत जायची गरज नाही. . .
उपाशी राहायची गरज नाही...
 शस्त्र खाली टाकू नका. . .

प्रत्येक व्यक्तीकडे गुणांचं शस्त्र आहे. . .
नेमकं तेच शस्त्र काढा  . .
आणि त्याचा उपयोग करून लढा. . . .
कोणताही देव-देवी तुमची लढाई लढणार नाही. . .

तुमची स्वप्नं फुकटात पूर्ण करून देणार नाही.
स्वतःची लढाई स्वत:च लढा !!!
👍☺👍

Written by : unknown creative 

Wednesday, June 22, 2016

गोंद्या आला रे ... २२ जून १८९७

"गोंद्या आला रे"

२२ जून १८९७

चाफ़ेकर बंधूंकडून पुण्याच्या गणेशखिंडीत रॅंडचा वध. २२ जून हा चाफेकर बंधूंनी केलेल्या रॅंड वधाच्या घटनेचा स्मृतिदिन.

देशात उफाळलेल्या असंतोषाचे प्रतीक म्हणून या थरारक प्रसंगाची गणना केली जाते. स्वातंत्र्य संग्रामात इंधन ओतण्याचं काम करणाऱ्या या घटनेचं ऐतिहासिक मोल मोठं आहे.

१८९६ च्या अखेरीस पुण्यात प्लेगचा कहर उसळला. त्या कामी सरकारने केलेली उपाययोजना व्याधीच्या दृष्टीने योग्य होती. पण, लोकांच्या भावना लाथाडून केल्यामुळे लोक संतप्त बनले. रूग्णालयात जाणं म्हणजे मरण असे त्यांना वाटू लागले आणि ते रोग लपवू लागले. त्यामुळे इंग्रजांचे शोधपथक पुण्यातील घराघरांतून धुमाकूळ घालू लागले. देवघरातील देवावर थुंकण्यापर्यंत त्यांची मजल गेली. लोकांच्या देवधर्माच्या भावनांना लाथाडणे, मुलीबाळींना घराबाहेर ओढणे आणि पुरुषवर्गाला अनेकप्रकारे अपमानित करणे याचा उच्छाद मांडला गेला होता. यामुळे दामोदरपंतांची रॅंड वधाची इच्छा तीव्र झाली.

पुण्याचे लोक अत्याचाराने त्रस्त असतानाच सरकारने व्हिक्टोरिया राणीचा हीरकमहोत्सव मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरवले. या दिवशीच रॅंडचा वध करायचा निश्चय दामोदरपतांनी केला. २२ जून १८९७ रोजी राणीच्या हीरकमहोत्सवा- निमित्त गणेशखिंडीत मेजवानी देण्यात आली. त्यावेळी अनेक युरोपियन हजर होते. या दिवशी दामोदरपंत, रानडे, बाळकृष्ण आणि विनायक आपटे आपापली रिव्हॉल्वर घेऊन सायंकाळी साडेसातच्या सुमारास बाहेर पडले आणि गणेश खिंडीतील गव्हर्नमेंट हाऊसपासून थोड्या अंतरावर काळोखात दबा धरून बसले.
मेजवानीनंतर रॅंड गाडीतून परत जाऊ लागला की "गोंद्या आला रे आला' असा खुणेचा शब्द उच्चारायचे ठरले. त्यासाठी वासुदेव चाफेकरांना मागावर पाठवण्यात आले.

मेजवानी झोडून पाहुणे गव्हर्नमेंट हाऊसमधून परतू लागले. गाड्या उतारावर येताच "गोंद्या आला रे आला' हा परवलीचा शब्द उच्चारला गेला आणि रॅंडसारखी दिसणारी आयर्स्टची गाडी दिसताच बाळकृष्णपंतांनी आयर्स्टच्या मस्तकावर पिर्स्तेल झाडलं. गाडीत बसलेल्या मिसेस आयर्स्टला हे कळताच तिने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली.

बाळकृष्णपंतांनी गोळी लागल्याने कोसळलेल्या व्यक्तीला पडताना पहिले परंतु वासुदेवरावांचा परवलीचा घोष अद्याप सुरूच होता. चुकून भलताच माणूस मारला गेला ही गोष्ट दामोदरपंतांच्या लक्षात आली. तोच रॅंडची गाडी आणि तिच्या पाठोपाठ धावणारा वासुदेव चाफेकर त्यांना दिसला.

दामोदरपंतांनी तात्काळ गाडीवर उडी घेऊन रॅंडच्या पाठीला पिस्तूल लावून चाप ओढला. गोळ्या फुफ्फुसातून आरपार जाऊन रॅंड बेशुध्द पडला. गोळ्या लागताच आयर्स्ट मरण पावला. रॅंड मात्र औषधोपचारांनी बेशुध्दीतून २२ जूनला थोडा शुध्दीवर आला पण त्याला कोणतेही वक्तव्य करता आले नाही. रॅडने ३ जुलै १८९७ रोजी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर प्राण सोडले. रँडची हत्या हि पहिली राजकीय हत्या ठरली.

पुणे युनिवर्सिटीजवळ असलेल्या गणेशखिंडीनजीक ही घटना घडली. चापेकर बंधु त्यावेळी निसटण्यात यशस्वी झाले असले तरी नंतर तिघांनाही नंतर पकडण्यात आले. रँड प्रकरणी हत्या करणाऱ्यांची नावे इंग्रज सरकारला कळवनारयास २०००० रू. चे बक्षीस देण्यात येईल  असे इंग्रज सरकारने जाहीर केले होते.

चापेकर बंधूंना द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे अटक झाली. रँडची हत्या केल्या प्रकरणी चाफेकर बंधूंची नावे गणेश व रामचंद्र द्रविड यांनी इंग्रज सरकारला कळवली. याचा बदला चापेकरांचे तिसरे बंधू वासुदेव हरी चापेकर व त्यांचे एक सहकारी महादेव रानडे यांनी खुन्या मुरलीधराजवळ द्रविड बंधूंचा वध करून घेतला. त्यानंतर त्यांनाही अटक झाली.

दामोदर चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले. त्यानंतर वासुदेव चापेकर यांना ८ मे १८९९ तसेच बाळकृष्ण चापेकर यांना १२ मे १८९९ रोजी येरवडा तुरुगात फाशी देण्यात आली.

रँडच्या वधाच्या वेळी दामोदरपंतांचे हे अवघे वय होते २७ वर्षे, बाळकृष्ण यांचे वय होते २४ वर्षे व वासुदेवरावांचे वय होते १८ वर्षे. अवघ्या विशी-पंचवीशीतील या तरुणांचा त्याग व शौर्य पाहून आजही उर अभिमानाने भरून येतो ! राष्ट्रकार्यासाठी तीन सख्या भावांनी केलेले हे बलिदान जगात एकमेव आहे ! त्यांच्या या त्यागास व शौर्यास विनम्र अभिवादन. 🙏
===========================

साभार - Nitin Pise

Balance sheet of Life

*BALANCE SHEET Of LIFE*

Birth is your
*Opening Stock*.
                 
What comes to you is
*Credit.*
                 
What goes from you is
*Debit.*

Death is your
*Closing Stock.*

Your ideas are your
*Assets.*

Your views are your
*Liabilities.*

Your happiness is your
*Profit.*

Your sorrow is your
*Loss.*

Your soul is your
*Goodwill*.

Your heart is your
*Fixed Assets*.

Your duties are your
*outstanding Expenses.*

Your friendship is your
*hidden Adjustment.*

Your character is your
*Capital.*

Your knowledge is your
*Investment*.

Your patience is your
*Bank Balance*.

Your thinking is your
*current Account*.

Your behaviour is your
*journal Entry*.

Bad things is your
*Depreciation*.

Have a nice balance sheet.

And ...

Always Remember
*GOD is your Auditor* 🙏

========================

Written by : unknown creative 

सुंदर काय असतं...

*सुंदर काय असतं...*

जे मन रागाहून जास्त अनुराग करतं आणि तिरस्कारा ऐवजी फक्त प्रेमच करतं...ते मन सुंदर...!!!

चांगल्या चेह-याहून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात...ते विचार सुंदर...!!!

कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते...ते नाते सुंदर...!!!

ज्यामध्ये एकमेकांची आठवण काढल्याशिवाय जगू शकत नाहीत...ते मनापासून असलेलं प्रेम सुंदर...!!!

कुठल्याही अपेक्षेशिवाय एकमेकांना दिलेली कायमची साथ... एकजीव असल्याची जाणीव असते...ती साथ आणि जाणीव सुंदर...!!!

जिथे आपलं मन विश्वासतं... जिथे आपलं मन जपलं जातं... असा मिळवलेला विश्वास आणि आपल्या मनाला जपणारं कोंदण सुंदर...!!!

🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

Written by : unknown creative 

Tuesday, June 21, 2016

जाग येता पहिल्या प्रहरी ...

❗जाग येता पहिल्या प्रहरी
   हळुवार डोळे उघडावे...

❗मग पाहून हातांकडे
   कुलदेवतेला स्मरावे...

❗अंथरुणातून उठताक्षणी
   धरतीला नमावे...

❗ध्यानस्थ होऊ भगवंताला
   आठवावे...

❗सर्व आन्हिके झाल्यावर
   देवाचरणी बसावे...

❗काही न मागता
   त्यालाच सर्व अर्पावे...

❗घरांतून निघता बाहेर
   आई वडिलांना नमावे...

❗येतो असा निरोप घेऊन
   मगच घर सोडावे...

क्षणभर दाराबाहेर थांबून
   वास्तूला स्मरावे...

❗समाधानाचे भाव आणून
   मगच मार्गस्थ व्हावे...

❗चेहऱ्यावर स्मित हास्य
   नेहमी बाळगून चालावे..

❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
   आनंदाने पहावे...

❗जगात खूप भांडण तंटे
   आपण शांत राहावे...

❗सतत तोंडात मध आणि
   मस्तकी बर्फ धरावे...

❗जीवन हे मर्त्य आहे
   नेहमी लक्षात असावे...

❗प्रत्येक क्षण हेच जीवन
   हेच मनी ठसवावे...

❗सत्याने वागून नेहमी
   जीवन आपुले जगावे...

             💞💞
आपला दिवस आनंदात जावो.
           
  💓💓 🗻👼🗻 💓💓


Written by : unknown creative

Art of life

🍁 😊🌹😊 🍁
       
सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात...

खूप जणं आपल्या जवळ येतात आणि दुरावतात...
 
सूर्यास्ता नंतर स्वतःची सावलीही दूर जाते...

पण जे लोक आपली शेवटपर्यंत साथ देतात तीच लोक आपली असतात....
         
जीवनात संकटांचं येणं म्हणजे
         "Part of life"
                 आणि...
 त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,
         बाहेर पडणं म्हणजे
          "Art of life" ...!

💐  💐 💎 😊 👑 💐 💐

 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


Written by : unknown creative 

आयुष्य खूप सुंदर आहे

कुणीतरी बर्फाला विचारले
आपण एव्हढे थंड कसे ?

"बर्फाने अतिशय छान उत्तर
दिले.... "

माझा भूतकाळही पाणी आणि भविष्यकाळ सुध्दा पाणीच...!!

मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ...?

💕आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकाना समजून घ्या..,  आणि एकमेकांना जीव लावा.... 💕

♻ 💫 ♻


Written by : unknown creative 

आयुष्याची ङायरी ...

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो पांडुरंगच असतो...

पण वाचणारे आपण असतो,
जीवनात खुप काही हव असत,
पण पाहिजे तेच भेटत नसत,
सर्व काही नशीबात असत,
पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत...

परिस्थिती जेव्हा अवघड असते  तेव्हा व्यक्ती ला "प्रभाव आणि  पैसा " नाही तर "स्वभाव आणि संबंध " कामाला येतात ...

म्हणून स्वभाव व संबंध असे ठेवा की समोरच्याला सतत आपली आठवण येत राहीली पाहीजे...

🙏 ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु  🙏


Written by : unknown creative 

वर्षाचे महिने असतात बारा, प्रत्येकाची न्यारीच त-हा

चैत्र नेसतो सतरा साड्या

वैशाख ओढतो व-हाडाच्या गाड्या

ज्येष्ठ बसतो पेरित शेती

आषाढ धरतो छत्री वरती

 श्रावण लोळे गवतावरती

भाद्रपद गातो गणेशमहती

आश्विन कापतो आडवे भात

कार्तिक बसतो दिवाळी खात

मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे

पौषाच्या अंगात उबदार कपडे

 माघ करतो झाडी गोळा

फाल्गुन फिरतो जत्रा सोळा

 वर्षाचे महिने असतात बारा

प्रत्येकाची न्यारीच त-हा ।।

♡☆♡☆♡☆♡☆♡☆♡☆♡☆♡


Written by : unknown creative

मिले सुर मेरा तुम्हारा ...

मिले सुर मेरा तुम्हारा
तो सुर बने हमारा
सुर की नदियाँ हर दिशा से
बहते सागर में मिलें ... बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा मिले सुर मेरा तुम्हारा … मिले सुर मेरा तुम्हारा …

(कश्मीरी)
चॉन्य् तरज़ तय म्यॉन्य् तरज़
इक-वट बनि यि सॉन्य् तरज़

(पंजाबी)
तेरा सुर मिले मेरे सुर दे नाल
मिलके बणे एक नवा सुर ताल

 (हिन्दी)
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा

 (सिन्धी)
मुहिंजो सुर तुहिंजे साँ प्यारा मिले जडेंह
गीत असाँजो मधुर तरानो बणे तडेंह

(उर्दू)
सुर का दरिया बह के सागर में मिले

 (पंजाबी)
बदलाँ दा रूप लैके बरसन हौले हौले

(तमिल)
 इसैन्दाल नम इरुवरिन सुरमुम नमदक्कुम
तिसै वॆरु आनालुम आऴि सेर मुगिलाय मऴैयय पोऴिवदु पोल इसै नम इसै…

(कन्नड)
 नन्न ध्वनिगॆ निन्न ध्वनिय,
सेरिदन्तॆ नम्म ध्वनिय

(तेलुगु)
ना स्वरमु नी स्वरमु संगम्ममै, मन स्वरंगा अवतरिंचे .

(मलयालम)
 निंडॆ स्वरमुम् नींगळुडॆ स्वरमुम्
धट्टुचॆयुम् नमुडॆय स्वरम .

(बांगला)
 तोमार शुर मोदेर शुर
सृष्टि करूर अइको शुर

(आसामी)
सृष्टि हो करून अइको तान

(उड़िया) तोमा मोरा स्वरेर मिलन
सृष्टि करे चालबोचतन

(गुजराती)
 मिले सुर जो थारो म्हारो
बणे आपणो सुर निरालो

(मराठी)
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

(हिन्दी)
सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिलें
बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा मिले सुर मेरा तुम्हारा … तो सुर बने हमारा

गीतकार : पियूष पांडे
संगीतकार : अशोक पत्की , डांबर बहादुर बुडाप्रिति , प्रताप के. पठाण
गायक : पं. भीमसेन जोशी , लता मंगेशकर , कविता कृष्णमूर्ति , एम. बालकृष्णमूर्ति , सुचित्रा मित्रा

( दूरदर्शनच्या लोकसेवा संचार परिषदेच्या वतीने १५ ऑगस्ट १९८८ रोजी देशातील १४ प्रमुख भाषेतील हे गीत राष्ट्राला अर्पण करण्यात आले. )