Thursday, July 14, 2016

Be the CEO of your own life ...

अप्रतिम लेख ....

दोन दिवसांपूर्वीची गोष्ट..
कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो.
मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसी ची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो.
पेपर खरं तर, नांवाला.
माणसं वाचत बसलो होतो.
विविध चेहऱ्यांची, आकारांची
माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती.
(एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो. असो.)

माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला.
जेमतेम चाळीशीचा असावा.
जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट.
अंगावर ब्रुट.
हातात मराठी पुस्तक.
खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला.
रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले.  ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं.
न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली..

पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला, ’वाचन आवडतं?’

‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.
’आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.

‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं.. अं…काही खास ठरवलेलं नाही.
इच्छा झाली की वाचतो.’
अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.

‘खायला आवडतं?’
 कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.

‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’

‘हो?  मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’

‘नाही नाही…रोज दोन वेळा..
आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच..
’हिट विकेट !

तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण.. तसंच वाचन !’

‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’
दयनीय चेहरा करत मी म्हटलं..

‘वेळ मिळत नाही. मी काढतो.
‘वेळ’ ही जगातली सगळ्यात ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो..

फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना !
फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला !
‘मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणार आहे' असं कोणी म्हटलं नां! की माझी खात्री होते, नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ त्याला हंसत असेल !’

मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’

मी आणखी हसू लागलो. ‘आय ऍम प्रीटी सिरीयस.. तुम्ही पाहिलंय यमाला ?

हो, मी पाहिलंय. दोन वर्षांपूर्वी.
रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरधाव गाडी आली. त्या दिव्यांच्या प्रकाश झोतातही मी अंधार पाहिला. त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं. त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच.
गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो..

हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन..
मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो.

माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस !

तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’

‘अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात..
मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं..

‘साफ चूक' !  माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !’

‘मी समजलो नाही.’

‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची संवय असते..
वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…
गंमत म्हणजे, आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही..
ते कुठेतरी गुंतवतो.....  भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून !

या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो..
मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो..

आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही !

मृत्यू म्हणजे – आहोत तिथे,
आहोत त्या क्षणी फुल स्टॉप !

खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो.

तुमच्यावरील या ‘अन्याया’ विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..

माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो..

म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं, यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं..

इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’.
या पुढे एकेका घासाची मजा घ्यायची..
आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’

‘म्हणजे नक्की काय केलं?’
माझी उत्सुकता आता वाढली होती.

‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली..

मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’

‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा ‘सीईओ’ वगैरे… जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.

‘वेल… तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही..

आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी ‘माझ्यापुरते केलेत त्यामुळे…’
‘मग..तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.

‘म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.

मला न कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला..
‘मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो..

दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.

माझ्या बोर्डवर विविध माणसे डायरेक्टर आहेत..

फरहान अख्तर,
शिवाजी महाराज,
अब्दुल कलाम,
डॉ.बी आर आंबेडकर
चार्ली चॅप्लीन,
महात्मा गांधीजी,
अमिताभ,
हेलन केलर,
जे आर डी टाटा
इत्यादि इत्यादि’....

माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.

‘या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं.
या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे.
काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात.

मी काय करतो… अं…उदाहरण देतो…
समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’ गांधीजींना विचारतो, काय करू?

मग ते सांगतील ते करतो.

व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो.

कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं.

मग माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात.

कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’

माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..
’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल'.
पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’ बनवावा हे उत्तम !
आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो..

जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत.

हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय..

गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light..

मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’

मी त्या तरुणाला नांव विचारलं, त्याने लगेच सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं.

मी एका ऍक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो.

तुम्ही…प्लीज..कुठल्या ऍक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.

अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे?
ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की !

घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’ मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं..
वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली..

मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता..

त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.

मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा बाप’ असेल का?’

परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.

कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य ‘चवीने’ जगत राहायची उर्जा देत राहील !

प्रत्येकाने वाचावा असा हा अप्रतिम लेख ....
.....परत परत वाचा
नक्की वाचा......

Be the CEO of your own Life .

बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात.

👍👉👍👉👍👉👍👉👍👉👍

Written by : unknown creative 

Sunday, July 10, 2016

कर ले तू प्राणायाम ...

🙋 कर ले तू प्राणायाम .....

कर ले तू प्राणायाम, सब रोग दूर हो जाएगा।
रोना नही होगा, जीवन खुशियों से भर जाएगा॥

जीवन तुम्हारा दूर्धर है आज, कल तू ही इतराएगा।
आज तुझे विश्वास नहीं, कल दुनिया को बतलाएगा॥
कर ले तू प्राणायाम …..

पांच मिनट भास्त्रिका करले, रक्त शुद्ध हो जायेगा।
सर्दी जुकाम एलर्जी दूर, मन स्थिर हो जायेगा॥

पन्द्रह मिनट कपालभांती कर, मुखमंडल तेज हो जायेगा।
गैस कब्ज, मधुमेह सहित, मोटापा दूर हो जाएगा॥
कर ले तू प्राणायाम ………

पांच बार बाह्य प्राणायाम कर, चंचलता दूर हो जायेगा।
उदर रोग सब दूर होकर , जठराग्नि प्रदीप्त हो जायेगा॥

दस मिनट अनुलोम-विलोम कर, सिरदर्द ठीक हो जायेगा।
नकारात्मक चिन्तन से दूर, आनंद, उत्साह बढ़ जायेगा॥
कर ले तू प्राणायाम ……….

ग्यारह बार भ्रामरी कर, सब तनाव दूर हो जायेगा।
रक्तचाप हृदय रोग सहित, उत्तेजना मिट जाएगा॥

इक्कीस बार ओंकार जनकर, अनिद्रा रोग ठीक हो जायेगा।
बुरे स्वप्नों से छुटकारा पाकर, ध्यान तेरा लग जायेगा॥
कर ले तू प्राणायाम ……….

तीन बार नाड़ी शोधन कर, रक्त संचार ठीक हो जायेगा।
बहरापन, लकवारोग मिटे, ऑक्सीजन बढ़ जायेगा॥

पांच बार उज्जायी कर, गला मधुर हो जायेगा।
सर्दी जुकाम सहित, हकलाना, ठीक हो जायेगा॥
कर ले तू प्राणायाम ……

ग्यारह बार शीतकारी कर , पायरिया दूर हो जाएगा।
दंत रेाग दूर होकर, शीतल शरीर हो जायेगा॥

ग्यारह बार शीतली कर, भूख प्यास मिट जायेगा।
मुंह गले के रोग सहित, पित्त रेाग मिट जायेगा॥
कर ले तू प्राणायाम ......…

तीन बार सिंहासन कर ले, दर्द गले का ठीक हो जायेगा।
अंत में हृस्यासन कर ले, हंसते जीवन बीत जायेगा॥

कर ले तू प्राणायाम, सब रोग दूर हो जाएगा ।
रोना नही होगा, जीवन खुशियों से भर जाएगा॥

ॐ शान्ति ॐ शान्ति ॐ शान्ति
--------------------------------------

Written by : unknown creative 

कविता - एवढंच देवाला मागावं....

" कट्टी आणि बट्टी"
--------------
अगोदरची पिढी तशी
खूपच  गरीब  होती
तरीही ती एकमेकांच्या
बरीचशी   करीब होती

आवर्जून सगळेजणं
जाणं येणं ठेवीत होते
सुख असो दुःख असो
हात पुढे येत होते

काका काकू , मामा मावशी
आपलेपणा वाटायचा
दिवाळीत , लग्नाकार्यात
अख्खा वाडा नटायचा

प्रत्येकजण प्रत्येकाला
भरभरून बोलायचा
आपलं माणूस दिसलं की
संपूर्णपणे उकलायचा

हसणं काय रुसणं काय
सारं कसं आतून यायचं
कट्टी संपून बट्टी झाली की
पुन्हा प्रेम ऊतू जायचं

आतलं दुःख सांगितलंकी
हलकं हलकं वाटायचं
अनुभवाच्या शिदोरीतून
बरंच  काही  भेटायचं

पहाडा सारख्या प्रश्नांनाही
तेंव्हा उत्तरं सापडायची
सगळीच माणसं चारचौघात
सुखदुःख  पाखडायची

अहंकार आणि स्वार्थामूळे
आता अनर्थ घडला आहे
नातेगोते  असून सुद्धा
माणूस एकाकी पडला आहे

सुबत्तेला सुख समजून
आपली माणसं तोडू नये
जगाशी नातं जोडताना
जुनी मुळे खोडु नये

भाऊ भाऊ बहिणी बहिणी
एकमेका कडे जातात का ?
समोरा समोर आल्यानंतर
दोन शब्द बोलतात का ?

वर्षानुवर्षे कॉलनीत राहून
कुणीच आपलं वाटत नाही
मी पणाच्या तोऱ्या मुळे
शेजाऱ्याशी पटत नाही

कुठे तरी कधी तरी
हा दुरावा संपला पाहिजे
घर असो दार असो
आपण माणूस जपला पाहिजे

उत्तरार्धात अनेक प्रश्न
जेंव्हा समोर नाचू लागतात
भांबावलेली माणसं तेंव्हा
धर्मग्रंथ वाचू लागतात

चलतीच्या काळात सुद्धा
मिळून मिसळून वागावं
नेहमी चांगली बुद्धी दे
एवढंच देवाला मागावं.

🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺

Written by : unknown creative 

Friday, July 8, 2016

बारिश पड़े तो ... खुद से मिल लीजिये ।।

बारिश पड़े तो भागिए नहीं.. छत नहीं खोजिये..
छाते कभी-कभार बंद रखिये.. किस बात का डर है..?
भीग जायेंगे..?
तो क्या हुआ.. पिघलेंगे नहीं..
फिर से सूख जायेंगे..
आपकी हजार रुपए वाली टी-शर्ट भी सूख जायेगी.. ब्रांड उसका लेविस से लेबिस नहीं होगा..
मोबाइल को पालीथीन में कस के रख लीजिये..
सड़क साफ़ है.. कोई नहीं आएगा..
उस स्ट्रीट लैम्प की पीली रौशनी में डिस्को करती बूंदों को देखिये..
थोड़ा धीरे चलिए.. जल्दी पहुंच के भी क्या बदल जाना है..
बारिश बदलाव है.. मौसम का.. मन का.. कल्पनाओं का.. और लाइफ के गियर का दिमाग से दिल की तरफ..
सब धुल रहा है.. प्रकृति सब कुछ धो रही है.. आप क्यूँ उसी मनहूसियत की चीकट लपेटे घूम रहे हैं..
कागज़ की नाव, कोचिंग में भीगे सिर आई वो लड़की, बारिश में जबरदस्ती नाचने को खींच के ले गये दोस्त..
सब चलते-चलते याद कीजिये..
दुहराना आसान नहीं होता.. दुहराना चाहिए भी नहीं.. लेकिन सहेजा जा सकता है..
ताकि ऐसी किसी बारिश में चलते-चलते सोच के मुस्कुराया जा सके..
ज़ुकाम से मत डरिये.. दवा से सही हो जायेंगे..
बारिश से डरेंगे तो फिर आपका महंगा वाला शावर भी ठीक नहीं कर पायेगा..
और वैसे भी.. मैंने शावर में सिर्फ लोगों को रोते सुना है.. मुस्कुराते नहीं.. बारिश आई है..
थोड़ा चल लीजिये.. खुद से मिल लीजिये.. मुस्कुरा लीजिये.. ।।

☁💧🌈☁💧🌈☁💧🌈☁

Written by : unknown creative 

Tuesday, July 5, 2016

चिमटीत पकडून ठेवायचंय खूप काही...

चिमटीत पकडून ठेवायचंय खूप काही.

शब्द, त्यांचे नेमके अर्थ
स्पर्श, त्यांचे नेमके अर्थ
सगळंच निसटून जायच्या आधी
घट्ट धरून ठेवायचंय खूप काही.

देहावरच्या खुणा, अस्पष्ट
मनावरच्या खुणा, जरा जास्तच स्पष्ट
बुद्धी फार काम करायला
लागायच्या आधीच
गोंदून घ्यायचंय खूप काही.

माझा श्वास, तुझ्यात गुंफण
तुझा श्वास, माझ्यात रिंगण
सवय 'व्यसन' बनण्याआधीच
सोडवून घ्यायचंय खूप काही.

मोकळं व्हायचंय..बेभान जगायचंय
होऊन द्यायचंय खूप काही..!!

- स्पृहा

🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁